Skip to main content

कशासाठी आणि कुणासाठी?

तसे मी अजून २ ब्लोग लिहितो. एक पोटाकरता आणि दुसरा मत प्रदर्शनासाठी. मग हा ब्लोग कशासाठी हा प्रश्न पडलाच असेल. खर तर नावातच ह्या ब्लोग चा आशय लपला आहे. समझनेवालो को इशारा काफी है....

आजकाल सोशल मेडियाच्या काळात मतप्रदर्शन वाढले आहे. गाढवं 'हुशार' आणि म्हशी 'beautiful' झाल्या आहेत. हे त्यांच्या WhatsApp DP वरून आणि facebook profile picture वरून समजून येईन. अजूनही भरपूर प्रकारचे नमुने इथे आहेत. त्यांच्या DP वरून या लोकांच्या काही categories तयार झाल्या आहेत. भाऊ, dude, cute, professional आणि सगळ्यात जास्त असणारे 'भीतीदायक'. त्यांना पाहिल्यावर सकाळी सकाळी धक्काच बसतो. स्वतःचे चित्रविचित्र हावभाव केलेले, ओठांचे चंबू केलेले आणि बोटे वाकडी तिकडी केलेली फोटोस सोशल मेडियावर अपलोड करून connect असणार्यांवर मानसिक अत्याचार चालू असतो.

असो, तर हे सगळे मिळून सोशल मेडिया वर टीका टिप्पणी करत असतात. आपण वाचत असतो, आवडले तर लाईक करतो किंवा वाचून सोडून देतो. यातून trending नावाची संकल्पना आली. ज्या एका विषयावर अशी वायफळ चर्चा होते तो विषय झाला trending. निव्वळ अक्कलशून्य जनता स्वतःला कुणी तरी मोठे महान असल्यासारखे भासवतात आणि स्वतःचीच भिंतीवर घाण करतात.

मला या गोष्टीचा खर तर वीट आलाय. पण काय करणार, माझे काम ह्या सोशल मेडीयाशीच निगडीत आहे. त्यामुळे इथे profile ठेवणे भाग आहे. मला स्वतःला लिहायला आवडते पण ब्लोगवर. याचे कारण म्हणजे मी ज्यांना ब्लोग ची लिंक देईन तेच माझे लिखाण वाचतील. त्या लिंकवर क्लिक करायचे कि नाही हा त्यांचा प्रश्न. माझी जबरदस्ती नाही. माझी अक्कल हि माझ्या ब्लोगवर पाझरणार. त्यामुळे या ब्लोगवरील माझ्या लिखाणावर तुमचे जे मत असेल ते comment विभागामध्ये लिहा मी त्याला रीतसर आणि योग्य तेच उत्तर देईन.

मी ह्या ब्लोग वर माझ्या मनात जे असेल तेच लिहीन. आजूबाजूला होणार्या घटनांवर, विक्षिप्तपणावर आणि एकूणच modern म्हणवल्या जाणाऱ्या विचारप्रवाहावर लिहीन. मी सरळ विचार करतो कि नाही हे माझ्या लिखाणातून तुम्हाला समजेल. माझे लेख तुम्ही घ्याल तसे असतील. मी पूर्ण प्रयत्न करेल कि आठवड्याला एकदा तरी लिहीन. नेहमी लिहित नाही म्हणून उगाच टोमणे देऊ नका. त्रास तुम्हालाच होईन.




Comments

Popular posts from this blog

माझा सूर्य. माझे वडील.

लहानपणापासुन नेहमी एक प्रश्न पडत असायचा. लोक एवढ्या सकाळी उठतात सूर्याची पूजा नित्यनियमाने करतात. कितीतरी वेळ हात जोडतात, मंत्र तंत्र काय काय पुतपुटतात. भीक मागितल्या सारखे तोंड करून हवे ते मागतात. आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या हे करायचे नाही, ते करायचे नाही असा सांगावा करतात. मावळणार्या सूर्याला हवे तितके दूषणे देतात. सूर्यास्ताला अपशकून मानतात. खरं सांगायचे तर बरीच जनता उगवणाऱ्या सूर्यापेक्षा संध्याकाळचा सूर्य जास्त अनूभवत असतात. जास्त सानिध्य हे मावळणार्या सूर्याचे असते. तरीही अश्या प्रथा का असू शकतात? मला वाटते मावळणारा सूर्य सुद्धा खूप सुंदर संधीप्रकाश देत असतो. आपल्या दिवसाचा शेवट किती मोहक आणि आल्हाद दायक करत असतो. पण आपण आपल्या पूर्वजांनी घालून प्रथेप्रमाणे चालत असतो. एका सुंदर दिवसाची अनुभूती आणि त्यापासून मिळणारी उर्जा आपल्याला सूर्यामुळेच मिळते. सूर्य दुपारी तळपत असतो तेव्हा चटके पण बसतात. उन्हाळ्यात अंगाची लाही लाही पण होते. पण शेवटी मानवाला सूर्याची गरज आहे. त्याच्या असण्यामुळे जगण्यासाठी मानवाला दाणा पाणी, जे काही लागते ते मिळत असते.  हीच मानसिकता माणसांच्